जाळपोळीच्या घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर : बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदीचा आदेश लागू; जिल्हाधिकारी दिपा मुघोळ मुंडे

पुणे दिनांक ३० ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड शहरात व प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर व त्यांचसोबत जिल्ह्यातील प्रमुख महामार्गावर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.बीड मध्ये मराठा आरक्षण मोठ्या प्रमाणावर पेटले होते.आज अनेक ठिकाणी जाळपोळीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत.त्याच पार्श्र्वभूमीवर १९७३चे कलम १४४ (२) लागू करण्यात आले आहे.अनिश्र्चित कालावधीसाठी ही जमावबंदी करण्यात आली आहे.अशी माहिती बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुघोळ मुंडे यांनी त्यांच्या आदेशान्वये लागू करण्यात आले आहे.
दरम्यान आज आमदार प्रकाश सोळंके.व आमदार संदीप क्षीरसागर व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय तसेच हाॅटेल पेटवून देण्यात आली आहे.. तसेच माजलगाव नगरपरिषद पेटवून देण्यात आली आहे.व एसटी बसची तोडफोड करण्यात आली आहे.राजकीय नेते व प्रशासन मधील आष्टीचे तहसील यांची शासकीय गाडी पेटवून देण्यात आली होती. तर जालना जिल्ह्यातील तहसील यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.व अनेक महामार्गावर टायर पेटवून आंदोलन सुरू केले होते.महामार्ग अडवून महामार्ग रोखून धरला होता.त्या मुळे महामार्गावर देखील संचार बंदी असणार आहे.या संचार बंदीत पाच व त्या पेक्षा जास्त नागरिकांना रस्त्यावर येण्यास प्रतिबंध असणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.