Murder or Suicide : सांगलीत आई आणि तीन मुलींची तलावात मृत

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पिलूर गावात तीन जणांचे मृतदेह तलावात तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने तलावात पडलेल्या महिला व तीन मुलींचे मृतदेह बाहेर काढले. अधिक तपास केला असता, सापडलेले मृतदेह त्याच गावातील सुनीता माळी (27) आणि तिच्या मुली अमृता (13), अंकिता (10) आणि ऐश्वर्या (7) यांचे असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सुनीता माळी यांच्या शेतजमिनीजवळील तलावात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार फाटा जवळ राहतात. घराजवळच त्यांची शेती असून लगतच लिंगनूर तलाव आहे. रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीता व तीन मुली बेपत्ता होत्या. दिवसभर शोधाशोध करूनही चौघेही सापडल्या नाहीत.
त्यांनी सासरवाडी कोहळी (ता. अथणी) येथेही विचारणा केली. त्यानंतर त्यांनी जत पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. पोलिस, ग्रामस्थ व नातेवाईक यांनी शोधाशोध केल्यानंतर तलावात चौघींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. सोमवारी रात्री एक वाजता चौघींचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. या घटनेबद्दल बिळूर भागात उलट सुलट चर्चा सुरू होती.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आत्महत्या केली का? त्यांचीही गांभीर्याने चौकशी सुरू आहे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.