पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांची माहिती : ' हैद्राबादला सरकारला जाण्याची गरज नाही, आमच्याकडे रिक्षाभरून कागदपत्रे; जरांगे पाटील यांचं सरकारला थेट आवाहन

पुणे दिनांक ६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा आरक्षण साठी उपोषणाला बसलेले कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद बोलावली होती.मनोज जरांगे पाटील यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकारच्या वतीने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्येक्षतेखाली एक समिती तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ही समिती हैद्राबादला जाऊन कुणबी कागदपत्रांची तपासणी करणार आहे.यावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला म्हत्वाचं आवाहन केले आहे. सरकारने कुठेही न जाता आमच्याकडे यावं.आमच्या कडे रिक्षाभरून कागदपत्रे आहेत ते सगळे पुरावे पाहिल्यावर एका दिवसात सरकारला अध्यादेश काढता येईल.असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान याप्रकरणी पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की " सरकारने इथे यावं आता कारण सांगू नये की चार दिवसात होणार नाही.मराठावाड्याच्या आरक्षण साठी ही कागदपत्रे आहेत.संपूर्ण महाराष्ट्राला आरक्षण देता येईल एवढे पुरावे इथं आणि घरी देखील आहेत.आम्ही समितीकडे कागदपत्रे देण्याचं ठरवलं होतं.पण समितीच्या वतीने काम केलं गेलं नाही. आम्हाला सरकारचा अमूल्य वेळ वाया घालवायचं नाही.सरकारचा वेळ जनतेच्या कामाला यावा म्हणून आम्हीच त्यांना पुरावे द्यायला तयार आहेत." असे जरांगे पाटील म्हणाले.
" सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावे म्हणजे सरकारचा वेळ वाचेल आणि एका दिवसात अध्यादेश निघेल एवढे कागदपत्रे द्यायला आम्ही तयार आहोत.हैद्राबाद पासूनचे सगळे कागदपत्रे आम्ही आणले आहेत मनात इच्छा शक्ती असेल तर आरक्षण देता येईल," असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.दरम्यान " तुम्हाला असं म्हणता येणार नाही की आता अधिवेशन नाही हे कागदपत्रे पाहिल्यानंतर राज्यपालांच्या परवाणगीने आपण वटहुकूम काढू शकता इतके कायदेशीर पुरावे आम्ही तुम्हाला देत आहोत.यासाठी सरकारने एक महिन्याची मुदत मागण्याची आवश्यकता नाही.एका दिवसात राज्यपाल यांची परवानगी घेऊन अध्यादेश काढू शकता ," असे उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.